ताजा खबरेंपॉलिटिक्स

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांची भारत जोडो यात्रेवर टीका

335

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा हे सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. पंढरपूर येथील दर्शनासाठी जाण्या अगोदर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर सडकून टीका केली. राहुल गांधी हे काँग्रेसमध्ये व भारतात प्रस्थापित होत नाहीत, म्हणून वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे त्यांना प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राहुल गांधी यांकडे काही नवीन अजेंडा नाही सावरकर व मोदीवर टीका करण्यापलीकडे राहुल गांधीकडे काही विषय नाहीत अशी टीका केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी केली. भाजप हा खरा इतिहास सांगते. कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपशब्द बोलले जात आहेत. त्यांनी इंग्रजांच्या विरोधात काळ्या पाण्याची शिक्षा भोगली होती. इतर स्वातंत्र्य नेत्यांसारख शिक्षा भोगली नाही, इंग्रजांची हुकूमत असताना काही नेते हे सोयीची शिक्षा भोगले, त्यांना तुरुंगात वृत्तपत्र, रेडिओ आणि घरंच जेवण मिळत होते.अशी टीका अजय मिश्रा यांनी केली.

Also Read: अमरावती जिले के मोर्शी और वरुद तालुका में भारी बेमौसम बारिश जारी है

Recent Posts

Advertisement

ब्रेकिंग न्यूज़